पहिले लग्न मोडल्यानंतर ह्या अभिनेत्री सोबत मनोज बाजपेयीनी केले होते दुसरे लग्न, जाणून घ्या अशी होती लव स्टोरी…

Bollywood Entertainment

बॉलिवूड इंडस्ट्रीचा सुप्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी आज आपला 51 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. मनोज वाजपेयी भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांवर त्यांने आपल्या अफलातून अभिनयाची छाप सोडली आहे. कुठलीही ओळख किंवा फिल्मी बॅकग्राउंड नसतानाही आज तो बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

मनोज बाजपेयीने आपल्या कष्टाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये हे स्थान मिळवले आहे. त्याचा जन्म बिहारमधील छोट्या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात झाला. मनोज बाजपेयीही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिले आहेत.

मनोज बाजपेयीचे एकूण दोन विवाह झाले आहेत. तो संघर्ष करत असताना त्याचे दिल्लीतील एका मुलीशी लग्न झाले. पण त्याचे पहिले लग्न 2 महिन्यांतच मोडले गेले. यानंतर मनोज बाजपेयीने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. मनोज बाजपेयीने 2006 मध्ये अभिनेत्री नेहाशी लग्न केले होते जिचे खरे नाव शबाना रझा आहे.

नेहाने बॉलिवूडमध्ये करीब चित्रपटातून पदार्पण केले असून या चित्रपटात बॉबी देओल मुख्य भूमिकेत होता. कृपया सांगा की लग्नानंतर नेहाने एक-दोन चित्रपटांत काम केले आणि फिल्म इंडस्ट्रीपासून अंतर बनवले. मनोज बाजपेयी आणि नेहा यांना अवा नायला नावाची एक मुलगी आहे.

मनोज बाजपेयी अखेर द फॅमिली मॅन या वेब सीरिजमध्ये दिसला होता त्याची यामधील भूमिका लोकांना खूपच आवडली होती. मनोज बाजपेयीने रिझर्वेशन गँग्स ऑफ वासेपुर चक्रव्यूह स्पेशल 26 सत्याग्रह अलीगड अशा दमदार  चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आजवर त्याने गँग्स ऑफ वासेपुर स्पेशल २६ शूट आउट एट वडाला बागी २ यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु आजही त्याला छोट्या चित्रपटांचेच जास्त आकर्षण आहे. किंबहूना अगदी कमी बजेट असलेल्या चित्रपटांमध्येच तुमच्या अभिनयाची खरी कसोटी लागते असे तो म्हणतो.

एका मुलाखतीत तो म्हणाला होता छोटय़ा चित्रपटांचा प्रवास हा वेगळा असतो. हे चित्रपट बनण्यासाठी आणि विकण्यासाठीही वेळ लागतो. एखादा कॉर्पोरेट निर्माता जेव्हा तुमच्या एकमेकांच्या सगळ्या अटी मान्य करून चित्रपट विकत घेतो तेव्हा कुठे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होतो.

पण अशा छोटय़ा बजेटच्या चित्रपटांसाठीच काम करायला मला आवडतं. या छोटय़ा चित्रपटांनीच मला मोठं स्थान मिळवून दिलं आहे. हे छोटे चित्रपटच मोठी कथा सांगतात आणि खूप सारे नवीन दिग्दर्शक आहेत ज्यांना या मोठय़ा गोष्टी छोटय़ा चित्रपटांतून सांगण्यात रस आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला अशा छोटय़ा चित्रपटांची रांग लागलेली दिसेल. असं तो म्हणाला होता.

बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांमध्ये मनोज वाजपेयी यांचं नाव आघाडीवर आहे. मनोज वाजपेयी आज एक प्रसिद्ध अभिनेता आहे. पण मनोज वाजपेयीला रामगोपाल वर्माच्या सत्या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. मनोज वाजपेयाची भिकू म्हात्रे आजही लोकांच्या लक्षात आहे.

रामगोपाल वर्माने यावेळी मनोज वाजपेयींना हा खूप छोटा रोल देत नसल्याचे सांगून तर मी एक मोठा चित्रपट करणार असून त्यात तुला मोठी भूमिका देतो असं सांगितलं. संघर्षाचे दिवस असल्याने मनोज वाजपेयी यांना आधीच आश्वासनांचा कंटाळा आला होता.

त्यामुळे मनोज वाजपेयीने मला ही भूमिकापण करु द्या अशी विनंती केली. त्यावर रामगोपाल वर्मानेही ठीक आहे विश्वास नसेल तर कर असं म्हटलं. पण माझ्या पुढच्या चित्रपटात तुला मोठी भूमिका मिळणार हे नक्की आहे असं आश्वासन दिलं.

त्यानंतर रामगोपाल वर्माने सत्या चित्रपटाची तयारी सुरु केली आणि त्यामध्ये मनोज वाजपेयी यांना भिकू म्हात्रेची भूमिका दिली. ही भूमिका मुख्य भूमिकेपेक्षाही जास्त प्रसिद्ध झाली आणि मनोज वाजपेयी नावाची पूर्ण बॉलिवूडला ओळख झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *