लॉकडाऊनमुळे आज प्रत्येक कुटुंब त्यांच्या घरात कैद झाली आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या करमणुकीसाठी अनेक जुन्या टीव्ही मालिका पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. जी पुन्हा एकदा लोकांच्या जुन्या आठवणींना ताजेतवाने करते. पण सर्वात जास्त पसंत केले जाते ते म्हणजें रामानंद सागरची मालिका रामायण.
टीआरपीबद्दल बोलतांना रामायण ने आतापर्यंतचा विक्रम मोडला आहे. जरी रामायण ची सर्व पात्रे आवश्यक आहेत पण त्यात असे एक पात्र आहे जर ते नसते तर राम 14 वर्षांच्या वनवासात गेलेच नसते. आपण कोणाविषयी बोलत आहोत हे तुम्हाला नक्कीच समजले असेल. होय आम्ही अभिनेत्री ललिता पवारबद्दल बोलत आहोत. आज आम्ही तुम्हाला ललिता पवार यांच्याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी सांगणार आहोत.
अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी नाशिकमध्ये श्रीमंत व्यावसायिका लक्ष्मणराव सगुन यांच्या घरात झाला. ललिताला अजूनही रामायण मधील मंथरा म्हणून घरोघरी ओळखले जाते. ती तिच्या काळात सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री होती.
ललिता पवार यांचं निधन होऊन बरीच वर्ष लोटली, पण आज लहान मुलांनाही त्यांचं नाव माहित आहे. त्यांनी खाष्ट सासूच्या अशा व्यक्तिरेखा साकारल्या ज्या पाहून लोक क्रूर सासूचं उदाहरण देण्यासाठीही त्यांचं नाव घेतात. फिल्मी पडद्यावर खाष्ट सासू अशीच त्यांची ओळख होती. त्यांनी काही सॉफ्ट रोलही केले, पण त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता निगेटिव्ह भूमिकांमुळे मिळाली. ललिता पवार यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टींचा उलगडा करणार आहोत.
एका घटनेने ललिता खलनायिका बनवलं:-
पडद्यावर कठोर दिसणाऱ्या ललिता पवार खऱ्या आयुष्यात मात्र वेगळ्या होत्या. ललिता पवार एकेकाळी बॉलिवूडमध्ये हिरोईन बनण्याचं स्वप्न बाळगून आल्या होता. पण एका घटनेने त्यांना खलनायिका बनवलं.
पहिल्या चित्रपटानंतर ललिता पवार यांचं मानधन एवढं वाढलं की अभिनयासोबत त्या चित्रपटांची निर्मितीही करु लागल्या. ललिता यांची सिनेकारकीर्द शानदार सुरु होती. पण त्यावेळी त्यांच्यासोबत अशी घटना घडली की त्यांचं आयुष्यच बदललं.
1942 मध्ये आलेल्या जंग-ए-आझादी या सिनेमाच्या सेटवर एका शूटिंगदरम्यान, भगवान दादा यांना ललिता पवार यांना थोबाडीत मारायची होती. या सीनदरम्यान झालेल्या घटनेने त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. यामुळे त्याचं हिरोईन बनण्याचं स्वप्न कायमचं तुटलं.
यामुळे डावा डोळा गमावला:-
भगवान दादा यांनी ललिता यांना एवढ्या जोरात थोबाडीत मारली की त्या खाली कोसळल्या आणि त्यांच्या कानातून रक्त येऊ लागलं. यानंतर त्यांच्या शरीराच्या डाव्या भागात लकवा गेला. ललिता पवार यांच्यावर तीन वर्ष उपचार सुरु होते. त्या बऱ्या तर झाल्या पण लकव्यामुळे त्यांना डावा डोळा गमवावा लागला. इतकंच नाही तर त्यांचा चेहराही कायमचा बिघडला.
डोळा खराब झाल्याने ललिता पवार यांचं हिरोईन बनण्याचं स्वप्न तुटलं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांना हिरोईनची भूमिका मिळाली नाही. मात्र इथूनच हिंदी सिनेमातील सर्वात खाष्ट सासूचा जन्म झाला. ललिता यांनी आपल्या कारकीर्दीत जवळपास 700 चित्रपटांमध्ये काम केलं.
अभिनेत्रीच नाही तर उत्कृष्ट गायिकाही:-
खरंतर फार कमी लोकांना माहित असेल की ललिता पवार उत्कृष्ट गायिकाही होत्या. 1935 मधील हिम्मत ए मर्दां सिनेमातील त्यांनी गायलेलं नील आभा में प्यारा गुलाब रहे मेरे दिल में प्यारा गुलाब रहे’ हे गाणं फारच लोकप्रिय झालं होतं.
मालिकेतही काम:-
ललिता पवार यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेत मंथराची भूमिका साकारली होती. वयाच्या 32 व्या वर्षीच त्या चरित्र भूमिका साकारायला लागल्या.
लकव्याशी लढल्या पण कॅन्सरशी हरल्या:-
1990 मध्ये ललिता पवार यांना जबड्याचा कॅन्सर झाला. यानंतर उपचारांसाठी त्या पुण्याला गेल्या. पण कॅन्सरमुळे त्याचं वजनच कमी झालं नाही तर स्मृतीभ्रंशही झाला होता. 24 फेब्रुवारी 1998 रोजी ह्या अभिनेत्रीच निधन झालं.