‘महाभारतामध्ये द्रौपदीचे पात्र निभवणारी रूपा गांगुली कोणत्या सीन नंतर रडली होती …

Entertainment

सुमारे तीन दशकांपूर्वी महाभारत दूरदर्शनवर दाखविण्यात आले होते. बी.आर. चोप्राचा हा भव्य कार्यक्रम पाहण्यासाठी देशभरातील लोक दूरदर्शन समोर बसत असत. घरात टीव्ही नसलेले लोक शेजार्‍यांकडे जात असत.

या शोमध्ये श्री कृष्ण पांडव आणि कौरव यांच्या व्यतिरिक्त द्रौपदीची व्यक्तिरेखासुद्धा खूप प्रसिद्ध झाली होती. हे पात्र लोकप्रिय टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री रूपा गांगुली यांनी साकारले होते.

रूपा गांगुली बंगाली सिनेमाची ज्येष्ठ अभिनेतत्री आहेत. रूपा गांगुलीची तुलना शबाना आझमीसारख्या ज्येष्ठ हिंदी सिनेमातील अभिनेत्रींशी केली जाते . रूपा गांगुलीने मृणाल सेन अपर्णा सेन गौतम घोष तुपर्णो घोष यांसारख्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

रुपा गांगुली द्रौपदीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झाली:-

रूपाचा जन्म 25 नोव्हेंबर 1966 रोजी कोलकाताच्या कल्याणी भागात झाला. त्यांनी जोगमाया देवी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. यानंतर त्यांनी मुक्तबंध या बंगाली मालिकेतून अभिनय जगतात प्रवेश केला. १९८६ मध्ये त्यांनी दूरदर्शनच्या टीव्ही मालिका गणदेवता सह हिंदी टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करण्यास सुरवात केली.

बंगाली चित्रपटात अशाप्रकारे एन्ट्री झाली होती:-

बंगाली चित्रपट प्रातिक या बंगाली चित्रपटाद्वारे त्यांनी बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमात त्या चिरंजीत सोबत दिसल्या होत्या. पण महाभारत शोमध्ये द्रौपदीची व्यक्तिरेखा साकारल्याने त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

या शोने त्यना प्रत्येक घरात लोकप्रिय केले. रूपाने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की अभिनेत्री होण्याची त्यांची कोणतीही योजना नव्हती. अचानक ते स्वतःच घडले. मात्र द्रौपदीच्या भूमिकेसाठी रूपा गांगुलीने खूप मेहनत घेतली होती.

वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागला:-

रूपा यांनी १९९२ मध्ये व्यवसायिक मेकॅनिकल अभियंता धुब मुखर्जीशी लग्न केले होते. पण त्यांच्या विवाहित जीवनात अनेक समस्या आल्या. रूपा आणि तिचा नवरा लग्नाच्या 14 वर्षानंतर २००७ मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले होते.

जानेवारी २००७ मध्ये रूपाने तिच्या नवऱ्याला घ टस्फो ट दिला. त्यांच्या नात्याबाबत रूपाने एका माध्यम मुलाखतीत सांगितले होते की मी दररोजच्या भांडणामुळे अस्वस्थ झाले होते. यामुळे मी तीन वेळा आ त्मह त्या करण्याचा प्रयत्नही केला होता.

दिब्येंदुबरोबर रिलेशनशिप मध्ये होत्या रूपा गांगुली:-

पतीपासून वेगळे झाल्यानंतर दिव्येंदु रूपाच्या आयुष्यात आले जें तिच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान होते. दिव्येंदुने पुन्हा त्यांना  अभिनयासाठी प्रेरित केले. त्यानंतर ती त्याच्यासमवेत मुंबईला गेल्या.

रूपाने दिव्येंदुविषयी सांगितले की त्यांच्यामुळेच मी कोलकाताहून मुंबईला परत आले. त्याने मला पुन्हा काम करण्याची प्रेरणा दिली. विशेष म्हणजे त्यांनी महाभारतात द्रौपदीची व्यक्तिरेखा साकारली ज्याच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताजी आहेत.

महाभारताच्या चीर हरन सीनच्या शू टिंगदरम्यान रूपा गांगुली खूप रडली:-

महाभारतातील द्रौपदीची व्यक्तिरेखा रूपा गांगुलीने पूर्णपणे जिवंत केली होती. या शोमध्ये चीर हरण च्या सीनचे शू टिंग करताना रूपा गांगुली खूप भावूक झाल्या होत्या. सीनचे शू टिंग संपल्यानंतर रुपा गांगुली खूप रडली होती.

दिग्दर्शकाने बर्‍यापैकी समजवल्यावर  ती शांत झाली. रूपा गांगुलीने अभिनयात दीर्घकाळ काम केल्यानंतर राजकारणाकडे वळल्या. २०१५ मध्ये त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी संसदेच्या सभागृहात राज्यसभेत खासदार म्हणूनही काम पाहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *