आपल्या स्वतःच्या हिमतीवर बॉलीवुड मध्ये सुपर हिट झाले हे कलाकार, नव्हत कोणी गॉडफादर ना घेतली कुणाची मदत …

Bollywood Entertainment

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केल्यापासून नेपोटिज्म विषयी बरीच चर्चा रंगली आहे आणि #Nepotismkilledsushant देखील सोशल मीडियावर बरेच ट्रेंड करीत आहे.

अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला त्या कलाकारांबद्दल सांगत आहोत ज्यांचा फिल्मी जगाशी काही सं-बंध नव्हता परंतु त्यांच्या टॅलेंटच्या आणि परिश्रमांच्या जोरावर त्यांनी त्यांच्या यशाचे शिखर गाठले आहे आणि बॉलिवूड मध्ये स्वताचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे .

१. पंकज त्रिपाठी:- एकेकाळी फिल्मी विश्वापासून दूर असलेल्या पंकज त्रिपाठीला छोट्या भूमिकेनंतर गँग्स ऑफ वासेपुर कडून मान्यता मिळाली आणि त्यानंतर त्याने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये आपली जादू साकारली आहे.

पंकज त्रिपाठी हे नाव आता बॉलिवूडमध्ये परिचयाचं झालं आहे. मसान पासून मिर्झापूर पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पंकजने त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. मूळचा बिहारचा असलेल्या पंकजचा हा प्रवास काही सोपा नव्हता. त्याला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही.

२. नवाजुद्दीन सिद्दीकी:- मोठ्या सं-घर्षानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलीवूडमधील एक नावाजलेले नाव झाले आहे. आज त्याची गणना इंडस्ट्रीतील सर्वात गुणी अभिनेत्यांमध्ये केली जाते.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकिला प्रकाशझोतात राहणं फार आवडत नाही. मात्र, त्याला गावाकडे वेळ घालवायला आवडतं. मात्र कामामुळे वेळ मिळत नाही, असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे चित्रपटाचं शुटिंग तसेच सगळेच कार्यक्रम ठप्प झाले आहेत. त्यामुळे नवाजुद्दीनला भरपूर वेळ मिळाला असून तो सध्या त्याच्या गावी आहे.

३, राज कुमार राव:- चित्रपटांमध्ये किरकोळ भूमिकांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या राजकुमार राव यांनी बॉलिवूडमध्ये अशी छाप पाडली की त्याला टॅलेंटचे पॉवरहाऊस म्हटले जाऊ लागले. त्यानेही बॉलिवूडमध्ये नेपोटिज्म होते हे मान्य केले होते.

४. शाहरुख खान:- बाहेरील एक सामान्य व्यक्ती असतानाही शाहरुख खान बॉलिवूडचा किंग खान झाला. त्याने छोट्या पडद्यापासून करिअरची सुरूवात केली होती. आज तो इंडस्ट्रीचा किंग खान आहे.

५. अक्षय कुमार:- अक्षय कुमारने वेटर म्हणून काम केले आणि थायलंडमधील हॉटेलमध्ये स्वयंपाक देखील केला. पण आपल्या परिश्रमाच्या जोरावर त्याने बॉलिवूडवर वर्चस्व गाजवले आणि आज 130 चित्रपट केल्यावर तो कोटी कोटी रुपयांमध्ये खेळत आहे.

६. इरफान खान:- २००३ मध्ये हासील चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या इरफान खानने स्वत: च्या प्रत्येक भूमिकेत बदल घडवून आणला त्याची ओळख बॉलिवूडमधील सर्वात उल्लेखनीय अभिनेत्यांमध्ये केली जाते. मागच्या काही दिवसातच इरफानने जग सोडले परंतु तो जिवंत होता तेव्हा त्याने या बॉलिवूड उद्योगावर राज्य केले.

७. आयुष्मान खुराना:- विकी डोनरमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर त्याने आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर सर्वांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. एकदा त्याने असेही म्हटले होते की जर येथे नेपोटिज्म नसता तर त्याला फार पूर्वी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला असता.

८. विद्या बालन:- टीव्ही सीरियल हम पांच मध्ये प्रथम दिसलेल्या विद्या बालनने तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये सर्वात खास ओळख निर्माण केली.

९. कंगना रनौत:- वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी कंगना घरातून बाहेर पडून मुंबईमध्ये आली होती मोठ्या संघर्षानंतर गँगस्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिला ब्रेक मिळाला आणि त्यानंतर तीचे आजचे यश तुम्हाला माहितीच आहे.

१०. सुशांतसिंग राजपूत:- 2008 मध्ये टीव्ही सीरियल किस देश में है मेरा दिल मधून करिअरची सुरूवात करणारे आणि पवित्र रिश्ता मालिकेद्वारे आपली ओळख निर्माण करणारे सुशांतसिंग राजपूत जेव्हा त्याला बॉलीवूडमध्ये स्थान मिळाले तेव्हा त्याने आपल्या कौशल्याने सर्वांना आ श्चर्यचकित केले.

एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी छीचोरे केदारनाथ सारख्या हिट चित्रपट दिले अजून सुशांतला खूप पुढे जायचे होते परंतु त्याने मृ-त्यूला मिठी मारली. बॉलिवूडमध्ये फक्त नेपोटिज्म चालते असा त्याला विश्वास होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *